• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

‘विकसित राष्ट्र’ की ‘मंदिर-मस्जिद वाद?’ कशाला प्राथमिकता द्यायची, ठरवण्याची ही वेळ आहे

केंद्र सरकारने ८ ऑगस्ट २०२४ रोजी ‘वक्फ’ संदर्भात दोन विधेयके लोकसभेत सादर केली. ‘वक्फ (सुधारणा) विधेयक-२०२४’ आणि ‘मुसलमान वक्फ (निरसन) विधेयक-२०२४’ अशी त्यांची नावं आहेत. वक्फ बोर्डाचं कार्य सुव्यवस्थित करणं आणि वक्फ संपत्तीचं व्यवस्थापन सुनिश्चित करणं असा त्याचा उद्देश असल्याचं सरकार सांगत आहे. पण सामाजिक विचारवंत, बुद्धिजीवी, अभ्यासक, भाष्यकार व राजकीय विश्लेषकांना भाजप सरकारच्या भूमिकेविषयी शंका वाटते.......

  • कलीम अजीम
  • Sun , 15 December 2024
  • 0 Comments
  • 1 Like

‘फसाना टू अफसाना’ अशी या पुस्तकाची शैली आहे. लेखकाने आपल्या व्यथांची मांडणी करताना कथात्म शैलीचा वापर केला आहे. त्यामुळे ‘व्यथा ते कथा’ असंही म्हणता येईल...

हे पुस्तक १४ ऑगस्ट १९४७ ते १७ सप्टेंबर १९४८ या १३ महिन्याच्या कालखंडातील हैदराबादमधील प्रशासकीय व सामाजिक घडामोडी मांडते. फाळणीचं राजकारण, त्याचे सामाजिक दुष्परिणाम, विलीनीकरणपूर्व हालचाली, निज़ामी धोरण, राजकीय कुटनीती, जनमानस, सांप्रदायिक धोरण, हत्याकांड, स्थलांतर, देशांतर इत्यादींवर लेखकाने प्रकाश टाकला आहे.......

  • कलीम अज़ीम
  • Sat , 22 June 2024
  • 0 Comments
  • 1 Like

‘काफ़िराना’ : सांप्रदायिक व धर्मांधतेला नेमस्त उत्तर देऊ पाहणारी कादंबरी

या कादंबरीकडे सद्यस्थितीतील हिंदुत्ववादी राजकीय धर्मांधतेचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणून पाहता येऊ शकेल. ही कादंबरी समकालाच्या भीषण वास्तवाशी दोन हात करणारी एक प्रगल्भ कलाकृती आहे. ती केवळ प्रश्न मांडत नाही, तर त्यातून उत्तरे शोधण्याचा स्वतंत्र विचारदेखील वाचकांसमोर ठेवते. शिवाय सकारात्मक ऊर्जा व संघर्ष करण्याची आणि सांप्रदायिक वातावरणाशी तोंड देण्याची जिद्द या कादंबरीत अंतर्भूत आहे.......

  • कलीम अजीम
  • Mon , 30 May 2022
  • 0 Comments
  • 1 Like

अनुपम अंकल, तुम्ही संवेदनाहीन झाला असाल, तर ईश्वर तुमचे भले करो. माझं तुमच्यावरील निखळ प्रेम तसूभरही कमी होणार नाही!

एफटीआय प्रकरणात टीका झाल्यानंतर तुम्ही उघडपणे ‘होय, मी मोदींचा चमचा आहे’, असं विधान केलं. तुम्ही स्वत:ला ‘जमुरा’ म्हणून घेतलं. मला फार दु:ख झालं. पुढे तुम्हाला ‘ले मेरे जमुरे...’ म्हणत तुमच्या आकांनी पद्म सन्मान दिला. त्या वेळी मला खूप आनंद झाला. तुम्हाच्या नावे शुभेच्छा संदेश पाठवला. तुम्ही घेतलेल्या राजकीय भूमिकेसाठी नव्हे, तर अभिनयासाठी तुम्हाला हा सन्मान दिलाय, असं मी स्वत:च्या मनाला समजावलं.......

  • कलीम अजीम
  • Sat , 19 March 2022
  • 0 Comments
  • 1 Like

मंटो आणि अब्बास सामान्य माणसाच्या जगण्याचा संघर्ष, त्याची गरिबी, दारिद्र्य, असाहय्यता तटस्थपणे मांडतात...

‘उर्दू अदब’ जसे जीवनसंघर्षाशी दोन हात करणारे, नागरी व सामाजिक प्रश्न, समस्या मांडणारे, तसेच सांस्कृतिक संघर्ष घडवणारे एक विद्रोही साहित्य राहिलेलं आहे. इतकंच नाही तर अस्मितावादी शिवाय गुढकथांनी (तिलिस्म) भारावलेलं, प्रेमप्रणय, रंजनवादी, अभिजनवादी साहित्यिकही ‘उर्दू अदब’मध्ये चिक्कार आहेत.......

  • कलीम अजीम
  • Mon , 20 December 2021
  • 0 Comments
  • 1 Like

रोहित सरदाना : रोहितनं कधीही सामान्य विचार करू दिला नाही. त्यानं मला नेहमी त्याचा द्वेष करायला भाग पाडलं...

तो मुस्लिमांचा रागराग करायचा, त्यांना अपमानित करायचा, ‘जिहादी’ म्हणायचा. मुस्लिमांना हिंदूंपुढील आव्हान म्हणून ट्रीट करायचा. त्यांच्या जगण्याचा हक्क नाकारायचा, शिव्या-शाप द्यायचा, मुस्लीम प्रवक्त्यांना चॅनेलवर बोलावून भलं-बुरं बोलायचा, ‘गद्दार’ म्हणायचा, ‘पाकिस्तानला जा’ म्हणायचा, बहुसंख्याकांना मुस्लिमांच्या विरोधात गुन्हे करायला उत्तेजित्त करायचा. अशा हिंस्र व्यक्तीला मी ‘चांगला’ कसं काय म्हणू?.......

  • कलीम अजीम
  • Sat , 01 May 2021
  • 0 Comments
  • 4 Like

हिंदू-मुस्लीम करणाऱ्या प्रसारमाध्यमांना गेल्या काही दिवसांपासून कुठलंच सांप्रदायिक खाद्य मिळालं नव्हतं. त्यांनी या (सुवर्ण)संधीचा लाभ घेतला!

केवळ बातम्या खपवण्यासाठी प्रसारमाध्यमं सामाजिक विद्वेष पसरवत आहेत. जास्तीत जास्त हिट्स मिळाव्यात म्हणून प्रक्षोभक टॉप बँड (हेडर) व हेडलाईन्स लावल्या जात आहेत. मृतांच्या बातम्या देताना भीती व दहशत माजवणं सुरू आहे. भेदक कॅप्शन तयार करून लोकांमध्ये धास्ती बसवली जात आहे. बातमीदारीचं तत्त्व विसरून प्रेतं दाखवली जात आहेत. आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत.......

  • कलीम अजीम
  • Wed , 01 April 2020
  • 2 Comments
  • 1 Like

न्यायालयाने ‘तिहेरी तलाक’ची प्रथा रद्द करूनही मुस्लिमांचे व पर्यायाने इस्लामचे शत्रुकरण थांबलेले नाही!

एका अर्थाने भाजपचे अभिनंदन करायला हवे की, त्यांनी शत्रुकरणातून का होईना या संवेदनशील प्रश्नामध्ये हात टाकला व ‘कुरआन’बाह्य प्रथेवर न्यायालयाकडून बंदी आणली; पण दुसरीकडे त्यांनी मुस्लिमांच्या सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नांवर डोळेझाक केली. अन्य सत्ताधाऱ्यांनी हे पाऊल उचलण्याची कुठलीच शक्यता नव्हती; कारण पुन्हा तेच ‘मतांचे राजकारण’ आड आले असते.......

  • कलीम अजीम
  • Fri , 06 December 2019
  • 2 Comments
  • 1 Like

‘फॅसिस्ट’ शिवसेनेला मान्यता मिळवून देण्याचे कंत्राट ‘सेक्युलर’ म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी घेतले आहे!

शिवसेना बदलत असेल तर त्याचे स्वागत आहे. पण ते तसे होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण त्यांनी मतपेटीसाठी ज्या पद्धतीने जमातवाद पोसला व त्याचे बळकटीकरण केले, या सर्वांची सवय ज्या मतदार व कार्यकर्त्यांना झाली, ते सेनेला बदलू देणार नाहीत. किंवा असेही होईल की त्यांच्यासाठी शिवसेना बदलणार नाही. पण केवळ ‘सेक्युलर’ मुद्द्यावर बदलून भागणार नाही, तर सेनेने मुसलमानांसंदर्भातील मुद्द्य़ावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.......

  • कलीम अजीम
  • Mon , 02 December 2019
  • 2 Comments
  • 2 Like

हैद्राबाद संस्थान अशा प्रकारे स्वतंत्र भारतात विलीन झाले...

निजाम मीर उस्मानअलींनी अतिशय भावनोत्कटतेने रेडिओवर आसिफजाह राजवटीचा शेवटचा संदेश प्रसारित केला. निजामांनी आपला निर्णय चुकल्याची जाहीर कबुली दिली. रिझवींमुळे आपली फार बदनामी झाली असे म्हटले. रिझवींनी लोकांची घरे-दारे लुटली, त्याबद्दल त्यांनी पश्चाताप व्यक्त केला. भारताने मला वेळोवेळी समझोत्याची संधी दिली, पण ती नाकारण्यास मला भाग पाडण्यात आले, असेही निजाम उस्मानअलींनी शेवटी कबूल केले.......

  • कलीम अजीम
  • Fri , 20 September 2019
  • 1 Comments
  • 2 Like

हैदराबाद संस्थानाच्या विलीनीकरणाचा दुर्लक्षित इतिहास

गेल्या ७० वर्षांपासून मुस्लीमद्वेषाच्या चाऱ्यावर सत्ताधारी वर्ग निवडणुकांतील मतांची पीककापणी करत आहे. प्रतिगामी व कथित पुरोगामी म्हणवणारे राजकीय पक्षदेखील मुस्लिमांच्या मृतदेहाची पायरी करून त्यावर सत्तेचं शिखर सर करत आहेत. पोटापाण्याची भूक भागवण्यासाठी धडपडत असलेल्या मुसलमानांच्या शत्रूकरणासाठी इतिहासपुरुषांना वापरले जात आहे. तो आणखी किती दिवस इतिहासातील कथित पात्रामुळे छळला जाणार आहे?.......

  • कलीम अजीम
  • Tue , 17 September 2019
  • 0 Comments
  • 6 Like

फ़ीरोज़ अशरफ़ : भारतातील गंगा-जमुनी सद्भावनेच्या परंपरेचे वाहक

फ़ीरोज़ अशरफ़ यांनी सामाजिक सौहार्द व सदभावनेसाठी आपलं आयुष्य वेचलं. भारत पाकिस्तानमधील राजकीय संबध सुधारावेत यासाठी त्यांनी त्यांच्या पातळीवर अनेक प्रयत्न केले. भारत-पाक मैत्रीचे ते शांतीदूत होते. त्यांनी अनेक वेळा पाकिस्तानचा दौरा केला. तिथं जाऊन त्यांनी भारताच्या बहुसांस्कृतिकतेची महती गायली. पाकिस्तानी लोकांसमोर स्वत:ला ‘हिंदुस्थानी’ म्हणताना त्यांना गर्व होत असे.......

  • कलीम अजीम
  • Mon , 10 June 2019
  • 0 Comments
  • 1 Like

निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर नाही, भावनिक मुद्द्यांवर जिंकल्या जातात!

प्रचंड उर्जा असलेला तरुणवर्ग देशात ५५ टक्क्यांपर्यंत आहे. यातले २५ टक्के तरुण २००० नंतर जन्मलेले आहेत. स्वातंत्र्य आंदोलन, पंडित नेहरूंचा समाजवाद, इंदिरा गांधींचा कणखरपणा, राजीव गांधीची दूरदृष्टी, मंडल आयोग, दिल्लीतली शीख दंगल, रामजन्मभूमी आंदोलन, बाबरी उदध्वस्तीकरण, मुंबई दंगल, गुजरातचा नरसंहार याबद्दल ही पिढी अनभिज्ञ आहे. संघाचं आक्रमक राजकारण, प्रखर मुस्लीमविरोध बघत-बघत ही पिढी मोठी झाली आहे.......

  • कलीम अजीम
  • Mon , 03 June 2019
  • 0 Comments
  • 1 Like

इम्तियाज जलील : ‘यश-अपयश हा आमच्यासाठी मोठा प्रश्न नाही. प्रत्येकांना समान संधी देऊन आम्ही लोकशाही मार्गानं जाणार...’

महाराष्ट्रात असा एखादा दलित नेता मला दाखवा, ज्याला या ‘सो कॉल्ड सेक्युलर’ म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी घडवलं असावं. मुसलमानांच्या बाबतीतही हेच लागू होतं. मुस्लिमांत अशी एखादी व्यक्ती दाखवा, जी सांगू शकेन की, ‘होय, मी महाराष्ट्रातील मराठी मुसलमानांचा नेता आहे.’ काँग्रेस-राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना असं कधीच वाटलं नाही की, राज्यात दलित आणि मुसलमानांतील नेता तळागाळामधून तयार व्हावा.......

  • कलीम अजीम
  • Fri , 24 May 2019
  • 1 Comments
  • 1 Like

‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे

धर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......

  • कलीम अजीम
  • Thu , 21 March 2019
  • 1 Comments
  • 2 Like

मौलाना अबुल कलाम आझाद : हिंदू-मुस्लीम ऐक्याचे पुरस्कर्ते

स्वतंत्र भारताच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्यांमध्ये मौलाना आझाद यांचा समावेश होता. मौलानांचं राहणीमान व आचार-विचार आदर्श होते. भारताला ‘दारुल अमन’ म्हणजे ‘जागतिक शांततेची भूमी’ बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आझादांचा आज स्मरण दिन. ऑटोमन मक्केत खलिफा म्हणून जन्माला आलेला हा नागरिक स्वतंत्र भारताचा पहिला शिक्षणमंत्री होता.......

  • कलीम अजीम
  • Fri , 22 February 2019
  • 1 Comments
  • 3 Like

हिंदू-मुस्लिम सौहार्द व सदभावनेच्या ‘गंगा-जमुनी’ प्रतीकांची पुनर्मांडणी

गेल्या पाच वर्षांचा कालखंड पाहिला तर ‘घर वापसी’पासून सुरू झालेली मुस्लिमद्वेषाची मोहीम कथित लँड जिहाद’पर्यंत येऊन ठेपली आहे. मुस्लिमाविरोधात हिंदू समाजाला उभं करून त्यांना धर्माच्या भ्रमात ठेवलं गेलं. त्यातून बहुसंख्याकांकडून भारताच्या गंगा-जमुनी संमिश्र सहजीवनाची बहुसांस्कृतिक सहिष्णू रचना नष्ट करून त्याच्या मूल्यव्यवस्थेला हादरे दिले गेले.......

  • कलीम अजीम
  • Fri , 18 January 2019
  • 1 Comments
  • 1 Like

एमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले!

पाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा ऑक्टोबर २०१८मधला दहावा लेख.......

  • कलीम अजीम
  • Tue , 25 December 2018
  • 0 Comments
  • 1 Like

मोबाईल गेम्स आणि ऑनलाईन गेम्स : डोकी भ्रष्ट करणारी निर्मिती

गेल्या महिन्यात मलेशियाच्या एका पालकांनी १० वर्षांच्या आपल्या मुलीला मोबाईल घेऊन देताना तिच्याशी लिखित करार केला. यात तिनं मोबाईलमध्ये जास्त वेळ गंतून राहू नये असा सल्ला होता. पालकांनी तिला शाळेत मोबाईल नेण्यास बंदी केली आहे. हा लिखित करार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पालकांनी मुलांना मोबाईल देताना अशा प्रकारचा प्रयोग करायला हरकत नाही.......

  • कलीम अजीम
  • Mon , 24 December 2018
  • 0 Comments
  • 1 Like

भारतात आळशी लोकांची संख्या दोन टक्क्यांनी वाढली आहे!

आपल्याकडे वेळ भरपूर असतो. पण आळस आपल्याला वेळेचं कारण पुढे करायला भाग पाडतो. दिवसभराचा वेळ कसा खर्च केला याची उजळणी केली तर आपल्याला दिसून येईल की, आपण किती अमूल्य वेळ फालतू कामात वाया घालवला आहे. त्या वेळेत महत्त्वाची कामं करून उरलेला वेळ व्यायामासाठी वापरता येऊ शकतो. दिवसभरात किमान दोन किलोमीटर पायी चालणं आरोग्याच्या दृष्टीनं हिताचं आहे.......

  • कलीम अजीम
  • Tue , 18 December 2018
  • 0 Comments
  • 2 Like

एमआयएमनं भारिपसोबत युती काय केली, सगळे पुरोगामित्व सिद्ध करायला लागले!

एमआयएमला भलं-बुरं बोलणं, ब्राह्मणांना शिव्या देण्यासारखं आहे, कारण त्याशिवाय पुरोगामीत्व सिद्ध कसं होणार? एमआयएमबद्दल सहानभूती दाखवली की, बेगडी पुरोगामी इतरांना प्रतिगामी, धर्मांध, देशद्रोही म्हणून झोडपण्यास तयार असतात. खरं सांगायचं झाल्यास एकगठ्ठा मुस्लिम कार्यकर्ते,  अनुयायी, सांगकामे बैल नव्या नेतृत्वाच्या मागे निघून जातील, या भीतीतून एमआयएमला धर्मांध, छुपा हिंदुत्ववादी व भाजपचा मित्र म्हणावं लागतं.......

  • कलीम अजीम
  • Wed , 03 October 2018
  • 1 Comments
  • 2 Like

देव आनंद : हरहुन्नरी, जवादिल, चिरतरुण, मल्टिस्टार आणि बहुअयामी व्यक्तिमत्त्व!

देव आनंद नेहमी स्वत:ला तरुण म्हणवून घेत. २००७ साली आत्मकथेच्या प्रकाशनावेळी लंडनमध्ये काही जणांनी त्यांना त्यांचं वय विचारलं. त्या वेळी ते एकाला म्हणाले, ‘मी १८ वर्षांचा आहे’, दुसऱ्याला सांगितलं, ‘मी १०० वर्षांचा आहे’; तर तिसऱ्याला म्हणाले, ‘मी एजलेस आहे. वयाच्या सीमेच्या पलीकडचा मी आहे’. देव आनंद चिरतरुण व्यक्तिमत्त्व होतं. वयाच्या ८८व्या वर्षांतही ते तेवढ्याच उत्साहानं दिग्दर्शन, निर्मितीमध्ये रमत असत.......

  • कलीम अजीम
  • Wed , 26 September 2018
  • 0 Comments
  • 3 Like

२०२५ काय, येत्या हजार वर्षांतही माझी भारतभूमी ‘दारुल इस्लाम’ किंवा ‘हिंदू राष्ट्र’ होऊ शकत नाही!

आज जहाल संघटनांनी इस्लामचं आक्रमक व हिंसक चित्र जगासमोर उभं केलं आहे. या कुंठितावस्थेमुळे धर्माचा सोयीचा अर्थ काहींना काढला. परिणामी वैश्विक पातळीवर इस्लामिक मूल्यांची विटंबना सुरू आहे. ती बदलण्याचा व त्यामागे असलेल्या विद्वेषी व जहाल विचारप्रणालीचा पराभव करावा लागणार आहे. दुसरीकडे अनुयायांमध्ये इशपरायणतेऐवजी धर्मांधता पसरत चालली आहे. जे धोक्याचं लक्षण आहे.......

  • कलीम अजीम
  • Mon , 03 September 2018
  • 1 Comments
  • 3 Like

प्रा. फकरूद्दीन बेन्नूर  : इन्ना इलैही राजेऊन!

२०१४ नंतर भारतात अल्पसंख्य व मुस्लिम सामाजाच्या अस्मिता व धार्मिक प्रतीकांवर हल्ले होत आहेत. गोरक्षेच्या नावानं दलित, मुस्लीम आणि मागास समुदायातील लोकांची मॉब लिचिंग केली जात आहे, अल्पसंख्य समुदायात असुरक्षितेची भावना बळकट होत आहे, अशा परिस्थितीत प्रा. बेन्नूर यांचं जाणे महाष्ट्राच्या प्रबोधनवादी चळवळीची फार मोठी हानी आहे.......

  • कलीम अजीम
  • Mon , 20 August 2018
  • 0 Comments
  • 1 Like

अबोध बालकांवर हा अत्याचार नव्हे तर काय आहे?

नुकतंच राज्य सरकारनं अंगणवाडी आणि तिथं काम करणाऱ्याला कर्मचाऱ्यांना ‘अत्यावश्यक सेवा’ कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये पुन्हा संभ्रम व प्रक्षोभाचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडी सेविकांना दोष देऊन प्रश्न सुटणार नाही. प्रत्येक वेळी अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाची चर्चा किमान वेतनापर्यंतच संपून जाते.......

  • कलीम अजीम
  • Thu , 16 August 2018
  • 2 Comments
  • 2 Like

एक अनाम शक्ती आपणा सर्वांना झुंडीत रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशील आहे!

एक विशिष्ट धर्मीयाविरोधात चाललेली हिंसा इतकी सवयीची कशी झाली, हे आज आपल्यालाही कळेनासं झालं आहे. परंतु हे काही एक-दोन वर्षांत झालेलं नाही. देशातली ही हिंस्र श्वापदं नव्यानं तयार झालेले नाहीत. सोशल मीडियाच्या नावाच्या व्हर्च्युअल भूतानं आमच्या मानवी संवेदना खाऊन टाकल्या आहेत. कितीही हिंसक घटना घडली की, अगदी सहजतेनं ती स्वीकारतो वेळेप्रसंगी उथळ प्रतिक्रीया देऊन मोकळे होतो.......

  • कलीम अजीम
  • Wed , 15 August 2018
  • 2 Comments
  • 4 Like

२००१ नंतर मुस्लीम व इस्लामविषयक पुस्तकांची मागणी झपाट्यानं वाढली

२००१ नंतर मुस्लीम व इस्लामविषयक पुस्तकांची मागणी झपाट्यानं वाढली आहे. ऑनलाईन खरेदीत इस्लाम हा विषय बेस्ट सेलरमध्ये आहे. वर्ल्ड ट्रेंड सेंटरवरील हल्ल्यानंतर जगभरात ‘इस्लाम फोबिया’चा नियोजनबद्ध पद्धतीनं प्रसार करण्यात आला. परिणामी इस्लाम काय भानगड आहे, हे जाणून घ्यायचा कल जगभरात अचानक वाढला. जागतिक स्तरांवर इस्लाम आणि मुस्लीमविषयक पुस्तकांची मागणी झपाट्यानं वाढली.......

  • कलीम अजीम
  • Mon , 23 April 2018
  • 2 Comments
  • 4 Like

कायद्याच्या नावाखाली तिहेरी तलाकचं केंद्र सरकारनं गुन्हेगारीकरण करू नये!

तिहेरी तलाकवर आणलेला प्रस्तावित कायदा चर्चेशिवाय लागू करू नये अशी भूमिका मुस्लीम महिलांसाठी काम करणाऱ्या संघटना व अभ्यासकांनी घेतली आहे. दुसरं म्हणजे यातून तलाक देणाऱ्या पुरुषांचं गुन्हेगारीकरण होता कामा नये अशी भूमिका मांडली जात आहे. तलाक दिल्यास आपला पती तुरुंगात जावा असा विचार कुठलीही महिला करणार नाही. तसंच तलाक दिल्यास जगात कुठंच तुरुंगवासाची शिक्षा नाही. मग भारतात कशी लागू करता येईल?.......

  • कलीम अजीम
  • Mon , 25 December 2017
  • 2 Comments
  • 2 Like

बाबरी पतनाच्या पंचवीस वर्षात काय गमावलं?

बाबरीचा वाद काहींना सतत पेटत ठेवायचा आहे. पण माझ्या मते वादग्रस्त जागेवर देशातील प्रत्येक नागरिकास उपयोगी पडेल असं जागतिक दर्जाचं ग्रंथालय उभारलं जावं. त्यात विज्ञान, सामाजिक शास्त्र व राज्यशास्त्रावर अभ्यास व संशोधन केलं जावं. अत्यल्प खर्चात जागतिक दर्जाचं शिक्षण मिळेल अशी सोय तिथं करण्यात यावी. जेणेकरून देशातील प्रत्येक जाति-धर्माच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल.......

  • कलीम अजीम
  • Wed , 06 December 2017
  • 1 Comments
  • 2 Like

काँग्रेस तरुण नेतृत्वाला का घाबरते आहे?

शहजाद यांनी राहुल गांधींच्या एका वाक्याकडे लक्ष वेधलं आहे. शहजाद म्हणतात, ‘२०१३ साली ज्यावेळी राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांनी एक वायदा केला होता की, एनएसयूआयमध्ये अनेक तरुण चेहऱ्यांना संधी व अधिकार देऊ. यावर राहुल गांधींनी अजून काहीच पाऊले उचलली नाहीत.’ जोपर्यंत तरुण कार्यकर्त्यांना योग्य संधी, मार्गदर्शन व दिशा मिळणार नाही, तोपर्यंत काँग्रेसला ठेवणीतले चेहरे बाहेर काढावे लागतील.......

  • कलीम अजीम
  • Sat , 02 December 2017
  • 0 Comments
  • 2 Like

सोहराबुद्दीन हत्येचं गुढ

एखादा मोठा गुन्हा घडला की, पोलिसांसमोर तपासाचं आव्हान असतं. दुसरीकडे वाढता जनक्षोभ असतो. सरकार आणि पोलिसांवर अपयशाचं खापर फोडत असतात. पोलीस आपली प्रतिमा जपण्यासाठी केवळ संशयाच्या आधारे अनेकांची धरपकड करतात. जनभावना लक्षात घेऊन, एक तर तो जेलमध्ये खितपत पडलेला असतो, नसता एन्काउंटरमध्ये मारला जातो.......

  • कलीम अजीम
  • Wed , 22 November 2017
  • 0 Comments
  • 4 Like

टिपू सुलतानची खरी भीती कुणाला?

आज टिपू सुलतानची जयंती. २०१५ साली कर्नाटक सरकारने टिपू जन्मोत्सव सोहळा शासकीय घोषित केला. सरकारचा हा निर्णय काहींना राजकारणाची आयती संधी घेऊन आला. त्यामुळे दरवर्षी काहीतरी निमित्त काढून विरोध व समर्थनांचं राजकारण सुरू आहे. अलिकडे काही ठरावीक मुस्लीम समूहांकडून टिपूला ‘चलनी सिक्का’ म्हणून वापरण्याची प्रथा वाढली आहे. मुस्लिमांत टिपूच्या नावानं संघटना काढून मिरवण्याचा प्रघात सुरू झालाय.......

  • कलीम अजीम
  • Fri , 10 November 2017
  • 1 Comments
  • 6 Like

संमेलन संपले, अखिल भारतीयच, पण मुस्लीम मराठी!

भारतात मुस्लीम मूलनिवासी असून त्यांनी इथल्या स्थानिक परंपरा व संस्कृतीचा स्वीकार केला. लाखो मुस्लिमांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता. आज सत्ताधारी पक्ष मुस्लिमांना परके ठरवतोय, यापेक्षा वेदनादायी गोष्टी दुसरी कुठली नाहीये. स्वातंत्र्यांसाठी प्राणाची आहुती दिलेल्या समूहाकडून देशभक्तीचं प्रमाणपत्र मागणं, लोकशाही राष्ट्राचं दु:ख आहे.......

  • कलीम अजीम
  • Mon , 06 November 2017
  • 1 Comments
  • 3 Like

मुस्लिमांच्या आजच्या भयानक परिस्थितीला ‘सो कॉल्ड’ साहित्यिकही जबाबदार

आजचा मुस्लीम बदलतोय. मेनस्ट्रीममध्ये येऊ पाहतोय. सांस्कृतिक अवकाश शोधू पाहतोय. कधी रेखाटणार ही प्रतिमा? मुस्लीम हात रिक्षावाला, भाजीपाला विकणारा, नऊवारी नेसून धुणं-भांडीसाठी जाणारी मुस्लीम बाई, ब्रेड व कुरकुरे विकणारा सायकलवाल्याला कधी मिळणार तुमच्या मराठी साहित्यात ‘स्पेस’? लाकूडतोड्या, भंगारवाला, पंक्चरवाला, गॅजेरवाला आणि बांधकाम मजूराला आहे, का जागा तुमच्या सो कॉल्ड मराठी साहित्यात?.......

  • कलीम अजीम
  • Sat , 04 November 2017
  • 2 Comments
  • 3 Like

उथळ नक्की कोण? टीव्ही चॅनेल्स की टीव्ही पाहणारे?

इतरांपेक्षा आपलं चॅनेल वेगळे भासवण्यासाठी गंभीर आणि हार्ड स्टोरींना रंजक बनवून प्रेझेंट केलं जात आहे. यातून सर्वच चॅनेल्स एकसारखाच न्यूज कंटेंट प्रसारित करत आहेत. त्यामुळे अशा न्यूज स्टोरी लिहिणाऱ्या लेखकांची गरज चॅनेल्सना भासू लागली आहे. मराठीत असे प्रयोग काही अंशी सुरू झाले आहेत. दुसरं म्हणजे टीव्ही बघणाऱ्यांचं अटेंशन क्रिएट करणारे अँकर जास्त लोकप्रिय ठरत आहेत.......

  • कलीम अजीम
  • Wed , 18 October 2017
  • 0 Comments
  • 6 Like

भेदभावाचा मुक्तीसंग्राम कधी?

१९५०-५१ साली समतोल विकास साधण्यासाठी मराठवाडा वेगळं राज्य व्हावं असं मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलं होतं. १९७८ साली पुन्हा हीच मागणी आली. याच साली विधिमंडळात वेगळ्या मराठवाडा राज्याची मागणी करण्यात आली होती. आता ही मागणी पुन्हा सुरू झाली आहे. जून-जुलैत यासंदर्भात जिल्हावार बैठका मराठवाड्यात पार पडल्या होत्या. मराठवाडा विनाअट संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाला, याचे परिणाम आजही भोगावे लागत आहेत.......

  • कलीम अजीम
  • Sun , 17 September 2017
  • 0 Comments
  • 1 Like

आंग सांग सू की यांचं नोबेल परत का घेऊ नये?

आंग सांग सू की या सध्या म्यानमारच्या 'स्टेट कौन्सलर' आहेत. सू की यांची जगभरात शांततेच्या दूत म्हणून ओळख आहे. १९९१ साली त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे. मात्र, आपल्या राष्ट्रात सुरू असलेल्या हिंसाचारावर त्या गप्प आहेत. त्यामुळे त्यांचं नोबेल परत घ्यावं अशी मागणी जगभरातून केली जात आहे. सू की विरोधात जगभर सह्यांची मोहीम राबवली जात आहे.......

  • कलीम अजीम
  • Wed , 06 September 2017
  • 0 Comments
  • 1 Like

'ट्रिपल तलाक' रद्द झाला, पण पोटगीचं काय?

सरकारच्या कुठल्याही सूचना न्यायालयानं मान्य केलेल्या नाहीत. मुस्लिम महिलांना न्याय मिळवून देऊ असं एकतर्फी विधान मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं. फक्त मुस्लिम महिलांच्याच न्यायाची घोषणा करणं धार्मिक भेदभावाचं लक्षण होतं. भारतात विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या, सोडून दिलेल्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. सरकारला त्यांचे अश्रू दिसत नाही का?.......

  • कलीम अजीम
  • Wed , 23 August 2017
  • 0 Comments
  • 2 Like

फक्त ‘इस्लाम खतरे में’लाच रस्त्यावर उतरणार?

आज देशात जे मॉब लिचिंग सुरू आहे, कदाचित ती एका भयान वादळाची चाहूल असू शकते. त्यामुळे वेळीच जागं होणं गरजेचं आहे. अशा वेळी घरात बसून शोक करणं हा मार्ग असू शकत नाही. मुस्लीम म्हणून नव्हे तर माणूस म्हणून रस्त्यावर या. कारण देशात माणुसकीची हत्या होतेय. रस्त्यावर येऊन अहिसंक मार्गानं घटनांचा निषेध नोंदवा. अशा वातावरणात अ-मुस्लिमांची मनं जिंकण्याची गरज आहे.......

  • कलीम अजीम
  • Mon , 10 July 2017
  • 0 Comments
  • 4 Like

उज्ज्वल निकम यांनी मोहसीन खटल्यातून माघार का घेतली?

मोहसीन शेख हत्या प्रकरणाच्या खटल्यातून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी माघार घेतली आहे. या खटल्यात सध्या आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. असं असताना उज्ज्वल निकम खटल्यातून स्वत:हून बाहेर पडले आहेत. निकम यांच्या निर्णयावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, तर दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटना आणि सरकारने उज्ज्वल निकम यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.......

  • कलीम अजीम
  • Wed , 14 June 2017
  • 0 Comments
  • 2 Like

शिवरायांचं ‘मटेरियल मार्केट’ आणि ‘कमोडिटी शिवबा’!

हिंदू, क्षत्रिय, मराठा यांचे ब्रँड म्हणून कडवेपणाचं उदात्तीकरण करणं सुरू झालं. आणि बघता-बघता शिवराय पुस्तकातून बाहेर आले. पोस्टर्स, सिनेमा, व्याख्यानांतून आम्ही मिळेल ते शिवराय स्वीकारत गेलो. जागतिकीकरणानं शिवरायांचं ‘मटेरियल मार्केट’ उभं केलं. असा हा ‘कमोडिटी शिवबा’ थेट इंटरनॅशनल ब्रँडपर्यंत येऊन पोहचला. शिवजयंतीला ग्लॅमर प्राप्त झालं आणि डीजेच्या अश्लील ठेक्यावर मावळे ताल धरू लागले........

  • कलीम अजीम
  • Mon , 20 February 2017
  • 2 Comments
  • 6 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.